२६ नोव्हेंबर, २००८: कसाब आणि त्याच्या ९ साथीदारांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला.
२७ नोव्हेंबर, २००८: रात्री १.३० च्या सुमारास कसाबला अटक करण्यात आली.
२९ नोव्हेंबर, २००८: कसाबने पोलिसांसमोर दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याची कबुली दिली.
१६ जानेवारी, २००९: कसाबवरील खटल्यासाठी आर्थर रोड जेलची निवड करण्यात आली.
२० आणि २१ जानेवारी २००९: कसाबने न्यायदंडाधिकारी आरवी सावंत यांच्यासमोर त्याचा गुन्हा कबूल केला.
२५ फेब्रुवारी, २००९: कसाबविरोधात सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली.
१५ एप्रिल, २००९: २६/११ दहशतवादी हल्ल्यावरील सुनावणीला सुरुवात.
८ मे, २००९: क्रूरकर्मा अजमल कसाबला साक्षीदारांनी ओळखलं.
२३ जून, २००९: हाफिज सईद २२ जणांविरोधात अजामीनपत्र वारंट जारी करण्यात आले.
२० जुलै, २००९: कसाबला विशेष न्यायाधीश एमएल ताहिलीयानी यांच्यासमोर त्याच्यावर लावण्यात आरोप कबूल केले.
१६ डिसेंबर, २००९: २६/११ दहशतवादी हल्ल्यावरील सरकारी पक्षाची सुनावणी पूर्ण.
१८ डिसेंबर, २००९: कसाबने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले.
२३ फेब्रुवारी, २०१०: ह्या खटल्यावरील अंतिम सुनावणीला सुरुवात.
६ मे, २०१०: कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली.
८ ऑक्टोबर, २०१०: हा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला.
२१ फेब्रुवारी, २०११: मुंबई उच्च न्यायालयाने कसाबची शिक्षा कायम ठेवली.
२९ जुलै, २०११: कसाबने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली.
२९ ऑगस्ट, २०१२: सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
५ नोव्हेंबर, २०१२: राष्ट्रपतींनी ही दयेचा अर्ज फेटाळला.
१९ नोव्हेंबर, २०१२: कसाबला आर्थररोड जेलमधून येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलं.
२१ नोव्हेंबर, २०१२: सकाळी साडे सात वाजता कसाबला येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली.
online marathi news